संजय बाराहाते
बीबीसी माझा
चंद्रपूर : आज (दि ४) बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात २७ पैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. आता एकूण २० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
उमेदवारी मागे घेतलेल्या पैकी शिवसेनेचे संदीप गिर्हे आणि अपक्ष उमेदवार म्हणून बहुजन समता पर्वचे अध्यक्ष आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांचे नाव चर्चेत आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून त्यांना चायची ‘केटली’ निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
बल्लारपूर मतदार संघात जातीय समीकरणे घट्ट आहेत. डॉ. संजय घाटे यांच्या उमेदवारी मागे घेतल्याने माळी समाजाचे मत विभाजनाची शक्यता दूर झाली आहे आणि सोबतच जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटनांची द्विधा अवस्था समाप्त झाली. याचा फायदा डॉ. अभिलाषा गावतुरे यांना होईल असे बोलले जात आहे.
डॉ. अभिलाषा गावतूरे या कुणबी समाजाच्या तर त्यांचे पती राकेश गावतुरे हे माळी समाजाचे आहे. मागील एक दशकांहून अधिक काळापासून डॉ. अभिलाषा गावतुरे राज्यात आणि जिल्ह्यात फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रीय कार्यरत आहेत. डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचल्या आहेत.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार असल्याची चर्चा विधानसभा क्षेत्रात आहे.
राजकारणी आणि जाणकार लोकांच्या मते ही निवडणुक बहुसंख्य ओबीसी एससी एसटी विरुद्ध प्रस्थापित अशी होणार आहे आणि त्यामुळे डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.